Skip to main content

Posts

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत
Recent posts

कुकरी बहादूर

दुबईच्या माझ्या वास्तव्यात मी काम केलेल्या जवळपास सगळ्या ऑफिसमध्ये मला असंख्य वल्ली भेटलेले आहेत. वेगवेगळ्या देशाचे, जातीचे, धर्माचे आणि वंशाचे लोक या अनोख्या देशात कामाच्या निमित्ताने आलेले असल्यामुळे हा देश एका अर्थाने 'सर्वसमावेशक' देश बनलेला आहे. इथे सगळेच जण या ना त्या रूपाने 'एकाच उपऱ्या जातीचे' असल्यामुळे अनौपचारिकतेच्या सगळ्या भिंती हळू हळू गळून जाऊन एकमेकांशी संवाद सुरु व्हायला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. माझ्या पहिल्यावहिल्या ऑफिसमध्येही अशा सगळ्या वातावरणात आठवड्याभरातच मी बऱ्यापैकी रुळल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर देशात एकटा राहायची माझी पहिली वेळ माझ्यासाठी विशेष तापदायक ठरली नाही.  ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांपेक्षा आधी परिचय झालेला ' रेशम ' हा आमच्या ऑफिसचा ' टी बॉय '. नेपाळमधल्या पोखरा शहरातून चार-पाच वर्षांपूर्वी दुबईला आमच्या ऑफिसमध्ये आलेला हा मनुष्य अतिशय चुळबुळ्या आणि बडबड्या होता. सुरुवातीला नावामुळे मला 'मादी' वाटलेला हा 'नर' खरं तर 'नरपुंगव' सदरात मोडणारा होता. अंगापिंडाने मजबूत आणि काटक असलेल

शापित यक्ष

चित्रपटात, नाटक आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं आवडत नसलेला मनुष्यप्राणी सापडणं आजच्या जगात मिळणं जवळ जवळ अशक्यप्राय आहे. मागच्या चाळीस-पन्नास वर्षात या क्षेत्रात झालेल्या जबरदस्त प्रगतीमुळे आज लहान मुळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण या दृक्श्राव्य माध्यमाशी जवळ जवळ व्यसनाधीन झाल्यासारखा जोडला गेलेला आहे. आजच्या 'डिजिटल' युगात आंतरजालाच्या पायावर उभी राहिलेली OTT platforms या सगळ्यात अजून भर घालत आहेत. या माध्यमाशी व्यवसायानिमित्त थेट जोडला गेलेला आणि अल्पावधीत काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायच्या धाडसामुळे आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेला फराझ माझ्या आयुष्यात काही क्षणच आला, पण त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांनी मला जे जे काही दिलं, त्याबद्दल आजन्म मी त्याच्या ऋणात बांधला गेलो.  फराझ हा मनुष्य काश्मिरी. भारत आणि पाकिस्तान ( आणि या दोन्ही देशांच्या कर्मकरंटेपणामुळे हळूच आत शिरून नंतर ऐसपैस पाय पसरलेला महाधूर्त चीन ) यांच्यात वर्षानुवर्ष सुरु असलेला जीवघेणा संघर्ष ज्या नंदांवनाचं महाभारतानंतरच्या भयाण कुरुक्षेत्रात रूपांतर करून गेला, त्या भूमीतल्या एका मूळच्या सुखवस्तू काश्मि

स्वच्छंदी

' आपल्या मर्जीचा मालक ' हे विशेषण बरेच वेळा बिनधास्त, बेलगाम जगणाऱ्या व्यक्तींना आपण सर्रास चिकटवत असतो. कोणाचाही मुलाहिजा नं बाळगणारे, जबाबदाऱ्यांचा फारसा विचार नं करणारे ,सहसा लग्नाच्या बंधनात नं अडकणारे आणि अडकलेच तर मुलं जन्माला घालून आपल्या 'स्वातंत्र्यावर' गदा आणू नं देणारे असे महाभाग आपल्याला अनेकदा आजूबाजूला दिसत असतात. युरोपमधल्या भटक्या हिप्पी जमातीच्या आत्म्यांचा जणू पुनर्जन्म झालेला आहे, अशा थाटातलं त्यांचं वागणं नाकासमोर बघून जगणाऱ्या लोकांसाठी 'अब्रमण्यम' असतं. अशाच एका मुलखावेगळ्या मनुष्याची माझ्या नव्या ऑफिसमध्ये गाठ पडली आणि सुरुवातीला काहीसा त्रासदायक वाटलेला हा अतरंगी प्राणी हळू हळू माझा चांगला दोस्त झाला.  पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या मला रिसेप्शनिस्टने ' ओरिएंटेशन' साठी मीटिंग रूम मध्ये बसायला सांगितलं आणि मदतनीसाला माझ्यासाठी कॉफी तयार करायला सांगितली. ही रिसेप्शनिस्ट माझ्या आधीच्या ऑफिसच्या रिसेप्शनिस्टप्रमाणे नाजूक, गोड आवाजाची वगैरे औषधालाही नव्हती. तिचा आवाज आयुष्यात पहिल्यांदा जो क्लायंट ऐकेल, तो आपण चुकून पोलीस

जपानी वामन

" मॅन, वॉन्ट तवू काम फो फीशींग?" आपल्या जपानी हेल असलेल्या इंग्रजीत हिराकू मला आग्रह करत होता. माझ्या दुबईतल्या सुरुवातीच्या ' स्ट्रगल ' च्या दिवसात एका खोलीत तीन डोकी अशा पद्धतीने राहत असल्यामुळे अनेकदा तऱ्हेतऱ्हेचे लोक माझे रूममेट म्हणून माझ्याबरोबर राहिले आहेत, त्यातला हिराकू हा एक विक्षिप्त प्राणी. समुद्र, मासे, वाळू, जहाज आणि भटकंती या विश्वात सतत रममाण असणारा आणि दुबईला दर शनिवारी विशेष परवाना घेऊन खोल समुद्रात मासेमारी करायला जाणारा हा माझा 'रूममेट' लाघवी स्वभावाचा असला, तरी पंचेचाळीस डिग्रीच्या उष्णतेत मासेमारीला जायच्या जीवघेण्या साहसाची मला तरी भीती वाटत होती. कसाबसा त्याला त्याच्या मार्गावर पिटाळून मी घरात परतलो आणि पंख्याच्या समोर बसून घाम टिपला. हा हिराकू म्हणजे एक वल्ली होता. एका संध्याकाळी मी रूमवर परतलो, तेव्हा मला एक भली मोठी 'बॅगसॅक ' बाजूच्या बेडवर पडलेली दिसली. बेडच्या खाली सपाता, दुर्बीण, व्यावसायिक छायाचित्रण करायला वापरतात तसा कॅमेरा आणि लेन्सेस,रेखाटन करायचं साहित्य अशा एक ना अनेक गोष्टी ठेवलेल्या दिसल्या. हा कोण नवा प्राणी आप

बाबा बंगाली

काही माणसांशी आपली मैत्री का होते, कशी होते आणि अचानक ती का तुटते, याचं उत्तर ' योगायोग ' याशिवाय वेगळं काही मिळणं कठीण असतं. मुळात ती मैत्री होणंच एक मोठं आश्चर्य असू शकतं. कोणाशीही चटकन संवाद साधू शकणाऱ्या आणि चित्रविचित्र माणसांची सोबत आवडणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर मुद्दाम एखाद्या व्यक्तीपासून लांब राहायचा प्रयत्न करायची वेळ तशी अभावानेच आलेली आहे. तनजीब हुसेन नावाच्या नावाचा बांगलादेशी महाभाग माझ्या आयुष्यात असाच अपघाताने आला आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात अपघातांची मालिका सुरु होईल की काय, अशी भीती वाटून कधी नव्हे तो मी त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जीवाचा चांगलाच आटापिटा करून घेतला. सुरुवातीच्या काळात दुबईला एका खोलीत दोन ते तीन डोकी अशा पद्धतीचं राहणं नशिबात आलेलं होतं. अशा प्रकारे राहताना बरोबरीची व्यक्ती कोणत्या गावची , पार्श्वभूमीची आणि संस्कृतीची आहे, हे काही दिवसात हळू हळू उलगडत जाणाऱ्या ओळखीतून समजत जाई. आपल्याकडच्या चाळीत भाडेकरू मालकावर डाफरू शकतो, पण दुबईला मात्र स्वच्छता आणि वेळेवर भाडं या दोन गोष्टी सोडल्या तर इतर कोणत्याही गोष्टींवरच्या तक्रारील

केरळचा बहिर्जी

मल्याळी माणसांशी माझं विशेष संबंध आखाती देशांमध्ये काम करतानाच आला. मुंबईला मुळात मल्याळी लोक तसे कमीच, त्यात मुंबईला एकदा राहायला सुरुवात झाली, की मल्याळीच काय पण अगदी परग्रहवासी सुद्धा सहज मुंबईकर होत असल्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये भेटलेले मल्याळी महाभाग मला फारसे वेगळे कधीच वाटले नाहीत. एक-दोन मित्रांच्या घरी गेल्यावर तितक्यापुरते कानावर पडलेले जड मल्याळी उच्चार आणि एका मैत्रिणीच्या मुंबईतच पार पडलेल्या लग्नसमारंभात केरळहून अगदी पारंपारिक वेशात आलेले शंभर-एक वऱ्हाडी यापलीकडे विशुद्ध मल्याळी अनुभव माझ्यापाशी नसल्यातच जमा होते. या सगळ्यामुळे असेल, पण देशाबाहेर पडून दुबईला आल्यावर जिथे तिथे भेटणारे मल्याळी लोक आणि अगदी समुद्रापार वेगळ्या देशात येऊनही त्यांनी नेटाने जपलेली त्यांची संस्कृती हा माझ्यासाठी नवा अनुभव होता. राहायची सोय करायच्या दृष्टीने दुबई मध्ये शोधाशोध सुरु केली आणि मला आश्चर्याचा धक्का बसायला सुरुवात झाली. जिथे तिथे " तू मल्याळी आहेस का?" अशी विचारपूस आणि " नाही" हे माझं उत्तर ऐकल्यावर " सॉरी बॉस..." असं नकारार्थी उत्तर हा अनुभव येत होता. सुरु

पूर्ण झालेला अपूर्णांक

एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये चहा घेत असताना अचानक समोर एक मिठाईचा भला मोठा डबा घेऊन आमचा 'ऑफिस बॉय' आला. इतका मोठा डबा, त्यात तऱ्हेतऱ्हेची वर्ख लावलेली मिठाई आणि वर अजून एका छोट्या डब्यात प्रत्येकाला वेगळी चॉकलेट्स हे सगळं नक्की कशासाठी चाललंय याचा मला उलगडा होईना. शेवटी त्याने " वो हाला है ना, उसको बेटा हुआ...उसकी मिठाई है..." अशी माहिती पुरवली. मिठाई हातात घेऊन मी काहीश्या गोंधळलेल्या अवस्थेत आजूबाजूच्यांकडे बघायला लागलो. त्यांची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. आम्ही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी 'आपल्याच डिपार्टमेंटमधली हाला' की अजून कोणती, असा आमच्या त्या 'ऑफिस बॉय' ला विचारलं. अक्ख्या ऑफिसच्या खबरबाता बहिर्जी नाईकचा केरळी वंशज असल्याच्या बेमालूमपणे काढून आणण्यात हा मनुष्य पटाईत होता. त्याच्या तोंडून ' तीच हाला' अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावर आमच्यात कुजबूज सुरु झाली. " अरे ती प्रेग्नन्ट होती असा कधी वाटलंच नाही...नवव्या महिन्यापर्यंत इतकी कशी बारीक राहू शकेल कोणी?" " दत्तक नाही ना घेतलं मूल ? विचारलं पाहिजे लिजोला...&q

एक होता विदूषक

शब्दविभ्रम, नक्कल, मिमिक्री, डबिंग अशा अनेक गोष्टींमध्ये कमीजास्त प्रमाणात निपुण असणारी अनेक कलाकार मंडळी आपल्याला दृश्य आणि अदृश्य माध्यमांतून अगदी दररोज भेटत असतात.जाहिरातींच्या क्षेत्रात काम करत असणारी चेतन सशीतल, सुदेश भोसले, मेघना एरंडे अशी मंडळी शेकडो कलाकारांचे आवाज जेव्हा लीलया काढून दाखवतात, तेव्हा काही क्षण आपले डोळे, कान आणि मेंदू एकत्र काम करत आहेत की नाही अशी शंका सतत येत रहाते. संवाद, आवाज आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना याचं काही क्षणात आपल्या मनावर खोल ठसा उमटत असतो आणि म्हणून कदाचित दृक्श्राव्य माध्यम हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा जास्त परिणामकारक आहे, असं जगातल्या अनेक तज्ज्ञांचं ठाम मत आहे. म्हणूनच असेल कदाचित, पण चार्ली चॅप्लिन अथवा लॉरेल-हार्डी ची जाड्या-रड्याची दुक्कल जेव्हा जेव्हा मी जुन्या कृष्णधवल मूकपटांमध्ये बघतो, तेव्हा त्यांच्या त्या काळात त्यांनी करून ठेवलेल्या अफाट कामाची महती कळते. आवाजाचं आणि रंगांचं माध्यम नसूनही त्यांनी केवळ दमदार कथानक, विलक्षण बोलका चेहरा आणि अतिशय विचारपूर्वक लावलेले कॅमेरा-अँगल या त्रिसूत्रीचा जोरावर आजच्या काळातही कालबाह्य